20
- CCRT UDAIPUR TRAINING (1)
- Dhanora shala vishesh (7)
- Kavita (5)
- READ AND LEAD (1)
- school photo (8)
- TAG (2)
- Zpps balsa (8)
- कविता (11)
- काही लेख (7)
- काही लेख (3)
- गुगल फॉर्म चाचणी (2)
- दिव्यांग दिन (1)
- पाठ्यपुस्तके 1 to 8 (1)
- प्रज्ञांकूर (34)
- प्रश्नपत्रिका (2)
- प्रश्नपत्रिका (1)
- बातम्या (2)
- बालमंडळ (2)
- मूल्यवर्धन (1)
- यशोगाथा (1)
- वैयक्तिक (5)
- शालेय पोषण आहार (1)
- शालेय पोषण आहार (2)
- शाळाभेट अहवाल (1)
- शिक्षण परिषद (6)
- साप्ताहिक शिक्षक ध्येय (3)
- सृजनशील शिक्षण ऑनलाईन परिषद १०-१२ जून २०२० (3)
तीन प्रतिक्रीया
तीन प्रतिक्रीया
एके दिवशी सकाळच्या उन्हात माखलेला
एक जण भेटला ओळखीचा वाटला म्हणून
ख्याली-खुशाली घेतली तर म्हणाला,
“माहीत नाही मजला
मी जगलो कसा अन मेलो कसा
आलो तसाच गेलो
ना वाटले जगावे ना वाटले मरावे”
एक जण भेटला ओळखीचा वाटला म्हणून
ख्याली-खुशाली घेतली तर म्हणाला,
“माहीत नाही मजला
मी जगलो कसा अन मेलो कसा
आलो तसाच गेलो
ना वाटले जगावे ना वाटले मरावे”
त्याच विचार चक्रात गुंतून राहीलो
दुपार होईपर्यंत …
तोच रस्त्यावरून जाणारा दुसरा एक जण
बोलता बोलता म्हणाला “दिसत नसले जरी
मृत्यूच्या गावाट घर माझे;
याचा अर्थ जीवनाच्या गावात माझे
वास्तव्य आहे असा होत नाही ”
विचार चक्राने मग तर अधिकच
वेग घेतला… सावल्या विखरून गेल्या
पक्षी घरट्याकडे परतायला लागलेले.
नदीच्या काठावर पाण्यात पाय सोडून
बसलेला एक जण दिसला;
तसा माझ्याकडे पाहून हसला
हसत हसतच म्हणाला, “जगतो असा मी की मृत्यूसही वाटते जगावे
धुंद होऊन जगातल्या कणकणात उरावे”
संतोष सेलूकर
परभणी
सामान्य माणूसच माझ्या लेखनाची प्रेरणा'-
*'सामान्य माणूसच माझ्या लेखनाची प्रेरणा'- *चित्रपट गीतकार* *बाबासाहेब* *सौदागर*.
दि.11/08/19 पेठशिवणी ता.पालम येथे विठोबा पाटील वाडेवाले स्मृती साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय गीतकार पटकथा लेखक बाबासाहेब सौदागर यांच्या शुभ हस्ते ग्रामीण साहित्यिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात बालाजी जाधव अंबड ,अनिता यलमट्टे उदगीर ,वसुंधरा सुत्रावे नांदेड यांचा समावेश होता. प्रास्ताविक शंकर वाडेवाले प्रसिध्द ग्रामीण कवी यांनी केले.मा.बाबासाहेब सौदागर यांनी आपला स्वतःचा संपूर्ण जीवनप्रवास लोकांसमोर मांडला.चित्रपट गीत लेखन करतांना आणि एकंदरच स्वतःचे स्थान निर्माण करतांना किती संघर्ष करावा लागतो हे सांगताना तर अगदी रसिकांचे डोळे पाणावले.ते म्हणाले ,"की ऐन संक्रांतीच्या दिवशी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून मी गाणं लिहायला कोल्हापूर कडे निघालो.तिथे जगदीश खेबुडकर गाणं जर त्यांना चांगलं वाटलं नाही तर तसाच कागद फाडून तोंडावर फेकतात असे मला कळले होते.म्हणून त्यांच्या समोर जाण्यांची हिम्मत होत नव्हती. मला एक अभंग लिहायला सांगितला.मी एक छान अभंग लिहून खेबुडकरांकडे गेलो.मनात खूप भीती होती.त्यांनी तो अभंग वाचला अन् म्हणाले मला माझ्या गादीचा वारसदार आज मिळाला.लिहीत रहा असा आशीर्वाद दिला. आता १०० पेक्षा अधिक चित्रपटांना मी गाणी लिहीली आहेत. सत्ताधिश चित्रपट स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला सुद्धा माझीच गाणी आहेत,हे सांगितल्यावर तर रसिकांनी त्यांना गाणं ऐकवण्याचा आग्रहच
धन्यवाद!
शब्दांकन
*संतोष सेलूकर*
परभणी
७७०९५१५११०
Subscribe to:
Posts (Atom)