20
- CCRT UDAIPUR TRAINING (1)
- Dhanora shala vishesh (7)
- Kavita (5)
- READ AND LEAD (1)
- school photo (8)
- TAG (2)
- Zpps balsa (8)
- कविता (11)
- काही लेख (7)
- काही लेख (3)
- गुगल फॉर्म चाचणी (2)
- दिव्यांग दिन (1)
- पाठ्यपुस्तके 1 to 8 (1)
- प्रज्ञांकूर (34)
- प्रश्नपत्रिका (2)
- प्रश्नपत्रिका (1)
- बातम्या (2)
- बालमंडळ (2)
- मूल्यवर्धन (1)
- यशोगाथा (1)
- वैयक्तिक (5)
- शालेय पोषण आहार (1)
- शालेय पोषण आहार (2)
- शाळाभेट अहवाल (1)
- शिक्षण परिषद (6)
- साप्ताहिक शिक्षक ध्येय (3)
- सृजनशील शिक्षण ऑनलाईन परिषद १०-१२ जून २०२० (3)
शिक्षण परिषदेतील सहभाग
सृजनशील
शिक्षण ऑनलाईन परिषद दि 10 ते 12 जून 2020
#CCEFinland#Covid19#CreativeLockdown# GoCorona#गोकोरोना CCE फिनलँड व्दारे आयोजित आंतरराष्ट्रीय शिक्षण
परिषदेचे आयोजन दि 10 ते 12 जून 2020 दरम्यान करण्यात आलेले होते. सृजनशील शिक्षण असा अनोखा विषय घेऊन ही परिषदेचे आयोजन फिनलँड
स्थित श्री हेरंब आणि शिरीन कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या शिक्षण
विषयात जगभरात नावाजलेल्या या संस्थेने केलेले होते.मला या परिषदेत सहभाग घेऊन माझा
शोधनिबंध सादर करता आला.त्यामुळे माझा विषय जगाच्या एका मोठया व्यासपिठावर मांडण्याची
संधी मला हेरंब सर यांच्यामुळे मिळाली त्यामुळे त्यांना धन्यवाद द्यायला पहिजे.मी
परभणी सारख्या अतिशय ग्रामीण आणि प्रगत जगापासून खूप दूर असणा-या एका जिल्ह्यातून
या परिषदेमध्ये सहभागी झालो होतो. जगभरातून अनेक शोधनिबंधक यांनी सहभाग घेतला होता.त्यांचे
शिक्षण विषयक विचार या निमित्ताने ऐकण्यास मिळाले.जगात शिक्षण क्षेत्रात फिनलँड ने
केवढी प्रगती केलेली आहे हे ऐकून खूप आनंद झाला.फिनलँड शिक्षण पध्दतीची ओळख झाली.आपणही
या पध्दतीचा आपल्या क्षेत्रात वापर करावा असा ही विचार मनात आला.SISU बॉक्स पाहण्यात
आला. नव्या शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यास प्रत्येकास आवडते त्याप्रमाणे माझे ही झाले.आपणही
या संस्थेसोबत काही उपक्रम आपल्या शाळेत राबवावे असेही वाटले. परिषदेत अनेक मान्यवर
यांचे विचार आवडले.प्रवीण दवणे, गानू सर, सुनंदन लेले सर, श्रुतीताई पानसे मॅडम, वनिता
पटवर्धन मॅडम, मनशक्ती केंद्रांचे श्री प्रमोदभाई, सरदेशमुख सर, नावलेकर मॅडम, काळपांडे सर, प्रशांत जोशी,डॉ रेवती नामजोशी, विवेक सर या सर्व आपल्या क्षेत्रात
यश संपादित केलेल्या मंडळीचे शिक्षणासंबधीचे विचार आणि त्यांचे कार्य भारावून सोडणारे
होते. धनिका मॅडम,शिरीन मॅडम आणि हेरंब सर यांनी वेळोवेळी अगदी स्क्रीनवर आपण कसे
स्पष्ट दिसायला पहिजे व कसे व्यक्त व्हायला पाहिजे याबाबत खूप व्यवस्थित मार्गदर्शन
केल्यामुळेच आम्हाला ही शिक्षण परिषद अटेन्ड करता आली.
एका यशस्वी आणि ज्यामधून मला खूप काही शिकायला मिळाले अशा परिषदेला
उपस्थित राहिल्याचा आनंद मिळाला
धन्यवाद
संतोष सेलूकर
7709515110
Santosh.selukar@gmail.com
शाळाभेट अहवाल
[3:50 PM, 1/12/2019] SANTOSH SELUKAR: आज दि.१२ जाने १९ परभणी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.बी.पी.पृथ्वीराज यांनी जि.प.शाळा बलसा बु.येथे भेट दिली.शाळेत प्रथम सातव्या वर्गात अध्ययनस्तर बाबत भागाकार फळ्यावर स्वत: लिहिले मुलांनी बरोबर उत्तरे करून दाखवले.वर्गशिक्षक कांबळे सर यांना मा.सिईओ सर म्हणाले.तुम्ही आधीच तयारी करून घेतलेली दिसते या उदाहरणाची .कांबळे सरनी सांगितले दुसरे उदाहरण द्या.मग दुसरेही मुलांनी सोडवले.मग मुख्याध्यापक कोण आहे?अध्ययन स्तर विचारला मी समोर होतो.मी ७० टक्के असल्याचे सांगितले.मग ५ मराठी शब्द लिहिण्यास सांगितले.समृद्ध , शौचालय,आकृती इ.काही मुलांचे काही शब्द चुकले. पण बरेच बरोबर आले.मग वर्ग ३री ४थी काळवीट म्याडम यांच्या वर्गात आले Eng rhyme म्हणण्यास सांगितले.दोन वर्ग एकत्र घेता का विचारले ? मग दोन्ही वर्गाच्या कृतियुक्त Rhymes झाल्या. विशेष म्हणजे मोनिका नावाची मुलगी आपला छोटा भाऊ सोबत आणते व त्याला सांभाळत स्वत:चे शिक्षण घेते त्या झोपलेल्या मुलांचे पांघरूण बाजूला करुण त्यांनी पाहिले.मु अ.म्हणून मी भूमिका मांडली.तिची बिकट परिस्थिती आणि भावंड सांभाळत खरं तर ती शाळाबाह्य होऊ शकते पण आम्ही तिला लहान भावंड सांभाळून शिक्षण घेण्यास प्रवृत्त केल्याचे स्पष्ट केले.ये अच्छी बात है असे म्हणाले.नंतर ६ वी वर्ग बाहेर व्हरांड्यात होता .हे असे का बाहेर ? मग पडलेल्या वर्ल्ड खोल्या दाखवल्या ठिक आहे Major Repair list यादीत नाव आहे का ? मी सांगितले.हो आहे असे सांगितले मग काम होऊन जाईल म्हणाले.मग बंडाळे म्याडमच्या पाचव्या वर्गात जाऊन शिवाजी महाराज बाबत पाच वाक्य सांगा बर्याच मुलांनी माहिती दिली.Eng विषय passage reading किती मुले करतात ? टप्पा २ फक्त ४ मुले २६ पैकी अहवाल पाहिला मग मु.अ.म्हणून मी म्हणालो सर ही पूर्वीची स्थिती आहे आता खूप बदल झालेला आहे सर्वाना इझी रिडींग बुक दिलेले आहेत.रात्रीचे अभ्यास गट कार्यरत केले आहेत त्याचे फोटो दाखवले.आता ७० टक्के मुले passage reading करतात.असे सांगितली.मग Eng rhyme कृतियुक्त पद्धतीने २४ सर्व मुलांनी सादर केली.ते पाहून समाधान व्यक्त केले. मग बंडाळे म्याडम यांना विचारले प्रगतशील मुलांसाठी काय नियोजन आहे. तेव्हा म्याडम नी विविध साहित्या सह उपक्रम घेतो सांगितले.ठिक आहे म्हणाले.सर आमचा सत्कार स्विकारा म्हणल्यानंतर म्हणाले सत्कार नको अध्ययन स्तर टप्पा ३ मध्ये अजून वाढ करा बाकी शाळेपेक्षा तुमची प्रगती चांगली आहे .मीच तुमचा सत्कार करतो असे म्हणाले.मग गाडीत बसले गाडी चालू झाली.मी परत विनंती केली सर आमचा हार तर घ्या.मग परत गाडीतून उतरून हार स्विकारला.आम्हाला हा अनुभव खूप बळ देऊन गेला.एकाही शब्दाने त्यांनी आम्हाला वेगळे बोलेले नाही किंवा काही झापाझापी नाही.आम्ही देखील त्यांच्यासमोर आमचं एकही रडगाणं गायलं नाही.जे बोललो ते possitive बोलल़ो त्यात नेहमी धिंगा मस्ती करणारी आमची सर्व मुले आज आज अशी काही शिस्तीत आणि गोड बोलू लागली की आमचा आत्मविश्वास वाढला.दडपण गेले उत्साह संचारला सर्व स्टाफ कदम म्याडम काळवीट म्याडम बंडाळे म्याडम ,कांबळे सर आम्ही सर्वांनी गेल्या जून पासून जीव ओतून काम केले त्यामुळेच आज आम्हाला गावकरी आमचे शाळेत येऊन विद्यार्थ्याचे कौतुक पाहू शकले. या प्रसंगी या सरपंच उप सरपंच सदस्य व शा व्यवस्थापन समिती सदस्य कांबळे साहेब कें प्र कांबळे साहेब बी.डी.ओ पूर्णा राठोड साहेब ग्राम सेवक उपस्थित होते.
[3:50 PM, 1/12/2019] SANTOSH SELUKAR: शब्दांकन
संतोष सेलूकर
प्रा शाळा बलसा बु.ता पूर्णा जि परभणी
[3:50 PM, 1/12/2019] SANTOSH SELUKAR: शब्दांकन
संतोष सेलूकर
प्रा शाळा बलसा बु.ता पूर्णा जि परभणी
शिक्षण परिषद गणपूर
🌷शिक्षण परिषद गणपूर 🌷 २०१९-२० वर्षातील पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद अविस्मरणीय ठरली.☘☘ सुरूवात अत्यंत साधेपणाने झाली.गावचे सरपंच व शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षण प्रेमी नागरिक परिषदेत सहभागी झाले ही अत्यंत स्तुत्य बाब वाटली.☘फक्त सहभाग घेतला नाही तर शाळेसाठी १४व्या वित्त आयोगात निधी देऊन ज्या गरजा आहेत; त्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन ही दिले. ☘ उद्घाटन व भाषणबाजी यात अधिक वेळ न घेता महत्त्वाच्या विषयाला सुरूवात झाली.🍀नवीन आलेले तांबे सर व वाडीकर सर यांचे स्वागत करण्यात आले.🍀 अध्ययन स्तर टाॅप शाळांचे अभिनंदन करण्यात आले.बाॅटम शाळांना आपण टाॅप पासून किती अंतरावर आहोत हे समजले. 🍀ब-याच वर्गाची गुणवत्ता ९० - १०० टक्के असल्याचे समजले 🍀 नंतर शिक्षकांचे तीन गट करण्यात आले १-३ ४-५ तसेच ६-८ अध्ययन निष्पत्ती नुसार विषय निहाय आराखडे तयार झाले 🍀
गटात चर्चा होत होत्या.प्रत्येकजण आपले अनुभव सांगत होता.☘ वेगवेगळी मत- मत्तांतरे दिसून येत होती परंतु आपसात मतभेद नव्हते.जो तो दुस-याच्या मताचा आदर राखत आपले मत मांडत होता.☘ बिबेकर सर यांनी स्वत:चे मुरमुरे टाकून प्रसादात चांगलीच भर घातली.🍀मग सर्वांनीच आपापले मुरमुरे प्रसादात टाकून वाटायला सुरूवात केली.🍀मग मा. केंद्रप्रमुख कांबळे साहेबांनी तर डायरेक्ट आजीबाईने दिलेला लाडूचा डब्बाच परिषदेत उघडला.एवढी बौद्धीक मेजवानी दिल्यावर काय ? सर्वं जण पाऊस नसल्यामुळे आनंदाच्या उन्हातच न्हाऊन निघाले.🍀 दुपारी गणपूर शाळेने सर्वांना रुचकर व स्वादिष्ट भोजनाची सोय केल्यामुळे शिक्षण परिषदेत जणू दुग्ध शर्करा योग पहावयास आला.🍀 सर्वांची पूर्णवेळ उपस्थिती हे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.🍀वर्गातील रोजच्या तोचतोपणाला कंटाळलेल्या शिक्षकांना महिण्यातून एक दिवस अशी मुक्तपणे शिक्षक मित्रांशी गप्पा मारणे अर्थात अनुभवाच्या शिदोरीची देवाणघेवाण करणे.यासाठीच तर या शिक्षण परिषदेचे प्रयोजन असते.☘ शेवटी मु.अ.बळवंतकर जाधव सर गरुड सर गोविंदवार व बिबेकर सर यांनी खूप परिश्रम घेतले व शिक्षण परिषद यशस्वी केली. ☘सर्व सि.आर.जी.मेंबर्सनी आपापली भूमिका योग्यपणे पेलली.☘पवार सर गडगिळे सर शिंदे सर जाधव सर यांनी नको नको म्हणलं तरी सर्वांना वेतनवाढीची भेट बि.ई.ओ.साहेबां मार्फत दिली तरी त्यांना ही धन्यवाद .☘अशी शिक्षण परिषद झाली की सर्वांच्या सदैव स्मरणात राहील .धन्यवाद
शब्दांकन
संतोष सेलुकर ,बलसा
गटात चर्चा होत होत्या.प्रत्येकजण आपले अनुभव सांगत होता.☘ वेगवेगळी मत- मत्तांतरे दिसून येत होती परंतु आपसात मतभेद नव्हते.जो तो दुस-याच्या मताचा आदर राखत आपले मत मांडत होता.☘ बिबेकर सर यांनी स्वत:चे मुरमुरे टाकून प्रसादात चांगलीच भर घातली.🍀मग सर्वांनीच आपापले मुरमुरे प्रसादात टाकून वाटायला सुरूवात केली.🍀मग मा. केंद्रप्रमुख कांबळे साहेबांनी तर डायरेक्ट आजीबाईने दिलेला लाडूचा डब्बाच परिषदेत उघडला.एवढी बौद्धीक मेजवानी दिल्यावर काय ? सर्वं जण पाऊस नसल्यामुळे आनंदाच्या उन्हातच न्हाऊन निघाले.🍀 दुपारी गणपूर शाळेने सर्वांना रुचकर व स्वादिष्ट भोजनाची सोय केल्यामुळे शिक्षण परिषदेत जणू दुग्ध शर्करा योग पहावयास आला.🍀 सर्वांची पूर्णवेळ उपस्थिती हे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.🍀वर्गातील रोजच्या तोचतोपणाला कंटाळलेल्या शिक्षकांना महिण्यातून एक दिवस अशी मुक्तपणे शिक्षक मित्रांशी गप्पा मारणे अर्थात अनुभवाच्या शिदोरीची देवाणघेवाण करणे.यासाठीच तर या शिक्षण परिषदेचे प्रयोजन असते.☘ शेवटी मु.अ.बळवंतकर जाधव सर गरुड सर गोविंदवार व बिबेकर सर यांनी खूप परिश्रम घेतले व शिक्षण परिषद यशस्वी केली. ☘सर्व सि.आर.जी.मेंबर्सनी आपापली भूमिका योग्यपणे पेलली.☘पवार सर गडगिळे सर शिंदे सर जाधव सर यांनी नको नको म्हणलं तरी सर्वांना वेतनवाढीची भेट बि.ई.ओ.साहेबां मार्फत दिली तरी त्यांना ही धन्यवाद .☘अशी शिक्षण परिषद झाली की सर्वांच्या सदैव स्मरणात राहील .धन्यवाद
शब्दांकन
संतोष सेलुकर ,बलसा
गुगल फॉर्म चाचणी
चाचणी क्रमांक 1
चाचणी क्रमांक 2
चाचणी क्रमांक 3
चाचणी क्रमांक 4
चाचणी क्रमांक 5
चाचणी क्रमांक 6
चाचणी क्रमांक 7
चाचणी क्रमांक 8
चाचणी क्रमांक 9
चाचणी क्रमांक 10
चाचणी क्रमांक 11
चाचणी क्रमांक 12
चाचणी क्रमांक 13
चाचणी क्रमांक 13
चाचणी क्रमांक 14
चाचणी क्रमांक 15
चाचणी क्रमांक 15
चाचणी क्रमांक 16
चाचणी क्रमांक 17
चाचणी क्रमांक 18
चाचणी क्रमांक 19
चाचणी क्रमांक 20
चाचणी क्रमांक 21
चाचणी क्रमांक 22
चाचणी क्रमांक 23
चाचणी क्रमांक 24
चाचणी क्रमांक 25
चाचणी क्रमांक 1
चाचणी क्रमांक 2
चाचणी क्रमांक 3
चाचणी क्रमांक 4
चाचणी क्रमांक 7
चाचणी क्रमांक 8
चाचणी क्रमांक 9
चाचणी क्रमांक 10
चाचणी क्रमांक 11
चाचणी क्रमांक 12
चाचणी क्रमांक 13
चाचणी क्रमांक 13
चाचणी क्रमांक 14
चाचणी क्रमांक 15
चाचणी क्रमांक 15
चाचणी क्रमांक 16
चाचणी क्रमांक 17
चाचणी क्रमांक 18
चाचणी क्रमांक 19
चाचणी क्रमांक 20
चाचणी क्रमांक 21
चाचणी क्रमांक 22
चाचणी क्रमांक 23
चाचणी क्रमांक 24
चाचणी क्रमांक 25
चाचणी क्रमांक 2
चाचणी क्रमांक 3
चाचणी क्रमांक 4
चाचणी क्रमांक 5
चाचणी क्रमांक 6 चाचणी क्रमांक 7
चाचणी क्रमांक 8
चाचणी क्रमांक 9
चाचणी क्रमांक 10
चाचणी क्रमांक 11
चाचणी क्रमांक 12
चाचणी क्रमांक 13
चाचणी क्रमांक 13
चाचणी क्रमांक 14
चाचणी क्रमांक 15
चाचणी क्रमांक 15
चाचणी क्रमांक 16
चाचणी क्रमांक 17
चाचणी क्रमांक 18
चाचणी क्रमांक 19
चाचणी क्रमांक 20
चाचणी क्रमांक 21
चाचणी क्रमांक 22
चाचणी क्रमांक 23
चाचणी क्रमांक 24
चाचणी क्रमांक 25
‘ नोकरीचा पहिला दिवस.....’
‘ नोकरीचा पहिला दिवस.....’
आयुष्यात असे बरेच क्षण आहेत की, ज्याविषयी लिहिता येईल आणि त्यातीलच हा एक अनुभव लिहिण्याचा छोटासा प्रयत्न. मी रोहिणी शरदराव पवार. माझे मूळ गाव येडशी ता. जि. उस्मानाबाद. माझ्या वडिलांची परिस्थिती तशी बेताचीच. आम्हा चारही भावंडांना वडिलांनी खूप काबाडकष्ट करून शिकवले. माझ्यापेक्षा एक बहीण मोठी, मी दोन नंबरची व दोन लहान भाऊ असा आमचा सुखी परिवार. वडिलांची इच्छा होती कि, सर्व मुलांनी खूप शिकावे. पण मोठ्या बहिणीचे शिक्षिका होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही आणि ते स्वप्न मी पूर्ण करावे अशी वडिलांसोबत माझी इच्छा होती. गावातच बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन 2001 साली माझा रत्नागिरी जिल्ह्यात खाजगी डीएड कॉलेजला नंबर लागला. खाजगी कॉलेज असल्यामुळे इतर कॉलेज पेक्षा तेथील फी सुद्धा भरमसाठ होती. आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचे म्हणजे आमच्या परिस्थितीला झेपण्यासारखे नव्हते. कारण ती कुटुंबातील वेळ अशी होती की मोठ्या बहिणीचे लग्न व दोन लहान भावांचे शिक्षण पूर्ण करायचे होते. पण मोठ्या बहीणीचे शिक्षिका होण्याचे स्वप्न अधुरे होते आणि ते माझ्याकडून पूर्ण करण्याचा माझा आणि वडिलांचा प्रयत्न असल्यामुळे वडिलांनी परिस्थितीवर मात करून हात उसने पैसे घेऊन एकदाचं ऍडमिशन केले. सन 2003 साली डीएड पूर्ण झाले व पुढे तीन वर्षांनी तो दिवस उजाडला ज्यादिवशी मला नोकरीची ऑर्डर आली.
दिनांक 3 मे 2006 या दिवशी जिल्हा परिषद औरंगाबाद येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्तीची ऑर्डर पोस्टमनने आमच्या घरी आणून दिली. त्यादिवशी तिसरी वेळ होती की, वडिलांनी माझ्यासाठी सर्वांना पेढे वाटले. पहिली म्हणजे सातवी स्कॉलरशिप होल्डर झाले म्हणून, दुसरी म्हणजे बारावीत मुलींमध्ये पहिली आले म्हणून आणि आज मी नोकरीला लागले म्हणून. माझ्या वडिलांना तर एवढा आनंद झाला होता की त्यांना आकाश ठेंगणे वाटु लागले.
मग तो अविस्मरणीय क्षण माझ्या आयुष्यातील नोकरीचा पहिला दिवस उजाडला. तो म्हणजे 12 जून 2006. बऱ्याचदा नोकरीच्या पहिल्या दिवशी घरून निघतांना दही साखर, शिरा असे काहीतरी गोडधोड खाऊन पहिल्या दिवशी जॉइन होतात असे म्हणतात. पण आमचे असे काही झाले नाही. मला मिळालेला जिल्हा औरंगाबाद तालुका सिल्लोड आणि शाळेचे गाव होते अंभई केंद्रातील शिरसाळा. नोकरी लागल्याचा आनंद मनात घेऊन, मी आणि माझे बाप्पा म्हणजे माझे वडील, आम्ही घरून भाजी पोळीचा डब्बा घेऊन 12 जूनला पहाटे 4 वाजता येडशी येथून औरंगाबाद गाडीत बसलो. सकाळची वेळ असल्याने आम्ही दहा वाजेपर्यंत औरंगाबादला पोहोचलो. बस मधून चढताना उतरताना दरवेळी मला हे जाणवत होते की, डीएडच्या प्रवासा पासून प्रत्येक प्रवासात माझी बॅग उचलून माझा बाबा किती दमलाय ते...... त्यामुळे यापुढे असा त्रास त्यांना यापुढे होऊ द्यायचा नाही असे मनात ठरवून आम्ही औरंगाबाद वरून बारा वाजेपर्यंत सिल्लोड ला पोहोचलो.
सिल्लोड मध्ये आल्यानंतर तिथले बस स्टँड पाहूनच मन उदास झाले. मग मी आणि वडील तिथे कुठल्या बसच्या पाटीवर शिरसाळा हे नाव दिसतंय का हे शोधू लागलो. पण कुठेच नाव दिसत नाही हे समजल्यावर तिथल्या बस डेपो मध्ये चौकशी केली. तेव्हा समजले की शिरसाळयाला फक्त दिवसात दोन वेळा गाडी जाते. एक सकाळी नऊ वाजता आणि दुसरी संध्याकाळी सहा वाजता, आणि ती पण मुक्कामी तिथेच जाते. मग आम्ही दोघांनी बस नसल्यामुळे जेवण करून घेतले व खाजगी वाहन कोठे मिळते का? याची चौकशी करून त्या ठिकाणी पोहोचलो. त्याठिकाणी जाणाऱ्या जीप उभ्या होत्या. आणि तिथे गेल्यावर समजले की एक पॅसेंजर गाडी भरायला कमीत कमी दोन ते तीन तास लागतील आणि आम्ही दोन अडीच वाजेपर्यंत कसेतरी अम्भई म्हणजे माझी केंद्र शाळा येथे पोहोचलो. तिथे केंद्रावर जॉईन झाले. तेथील परिस्थिती पाहून सर्वजण असे म्हणत होते की, ही मुलगी शिरसाळयाला जाणार कशी? एकटी राहील कशी? अवघड आहे हिचे. आणि यांनी गाव बदलून घ्यायला पाहिजे. पण आम्हाला नोकरी लागल्याचा आनंद आणि गाव बदलून मिळेल की नाही याची भीती. यामुळे आम्ही तिथून शिरसाळ्याला जाण्यास निघालो. स्टॉप वर आलो तर एकही वाहन नाही, मग जायचे कसे? स्टॉप वरचे लोक म्हणू लागले गावात एकच जीप आहे आणि ती पण सकाळी दिवसातून एकदाच भरून येते आणि संध्याकाळी एकदाच वापस जाते. मग मात्र जास्त टेन्शन येऊ लागले. पण तरी वडिलांना लोकांचे बोलणे प्रेरणा देत होते. कारण स्टॉप वरील शिरसाळ्याचे लोक म्हणत होते की बरं झाल आमच्या गावात मास्तरीन बाई आल्या. आम्हाला कळतंय तस आतापर्यंत एकही मास्तरीन बाई आमच्या शाळेत आल्या नव्हत्या. आणि वडिलांना सांगत होते की, "आमचे गाव खूप चांगले आहे. यांना काहीच त्रास होणार नाही". पण मला प्रश्न पडला होता की मी राहु कुठे? एकटीलाच राहावे लागेल. अंभईला राहिले तर अप डाऊन कसे करू? असे माझे विचार चक्र सुरु होते, तोपर्यंत वडिलांनी एक रिक्षा ठरवला, आणि त्या रिक्षावाल्याने अंभईवरून शिरसाळा सहा किलोमीटर अंतर एकदा जाऊन परत येण्याचे दोनशे रुपये घेतले.
मग काय मी आणि माझे बाप्पा माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी शाळेवर जॉईन व्हायला रिक्षाने निघालो. रिक्षात बसल्यावर माझ्या मनात एकच विचार गाव बदलून मिळेल का? मिळवणे शक्य नाही. कारण आपल्याला येथे ओळखीचं कोणीच नाही. आणि या बदलाबदली मध्ये बाप्पाची आणखीनच परेशानी होईल. आणि त्यात केंद्र शाळेवर चर्चा ऐकली की, गाव फार डेंजर आहे बाबा. असे एक ना अनेक प्रश्न मनात गोंधळ करत होते. आणि तेवढ्यात सहा किलोमीटरचा प्रवास करून रिक्षा शिरसाळा गावात आला. गावाच्या सुरुवातीलाच शाळा. गावाच्या पुढे एक सिरसाळा तांडा. तेथील लोक लमाणी समाजाचे होते. मग तांड्यावर जायचे का इथेच थांबायचे हा पुन्हा प्रश्न पडला. आणि मग ऑर्डर वर पाहिलं तर शिरसाळा हे गाव होते. म्हणून तेथेच उतरलो. शाळेचे छोटेसे गेट, सुमारे तीन ते साडेतीन वाजण्याची दुपारची वेळ शाळेवर पोहोचायला झाली. शिरसाळा मध्ये अगोदरच माहिती झाल्यामुळे सगळी मुले आनंदी होती की, आम्हाला नवीन मॅडम आल्या म्हणून. गेटमधून मी आणि बॅग अडकवलेले माझे बाप्पा आम्ही शाळेत प्रवेश केला. दुपारचा लघु मध्यंतर होता, मुले-मुली धावतच माझ्याकडे आली आणि त्यातील बरीच मुले मला Good Afternoon म्हणत होती. ती मुले आणि त्यांचा आनंद पाहून मला खूप आनंद झाला. त्यांना Good Afternoon म्हणून मी शाळेत सगळीकडे नजर टाकली. शाळेच्या दर्शनी भागात झाडे, सुंदर मैदान, रंगरंगोटी त्यामुळे शाळा छान वाटली. आणि थोडसं मन रिलॅक्स झाले. तिथे अगोदर तीन शिक्षक होते. आज पर्यंत लेडीज कोणीच नव्हती, त्या गावात शाळा सुरू झाल्यापासून पहिली शिक्षिका मीच होते त्यामुळे मला मॅडम कमी आणि ताई जास्त म्हणू लागले.
मग मी ऑफिसमध्ये गेले, मुख्याध्यापक श्री जंजिरे सर माझ्या वडिलांशी बोलले. त्यांनी कागदी प्रोसेस सगळे अगोदरच पूर्ण करून ठेवलेली होती. मग आम्ही सही करण्याच्या अगोदर गाव बदलून मिळेल का? याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ते असे म्हटले की, मॅडम येथील सरपंचांनी अगोदर तालुक्याला सांगून ठेवले की, आमच्या येथे अगोदरच एकही मॅडम आल्या नाहीत. आल्या त्या अशाच बदलून गेल्या. त्यामुळे तुम्ही यांना गाव बदलुन देऊ नका. मग म्हंटलं आता काय करावं? एकदा जॉईन झाल्यावर पुन्हा लवकर गांव बदलून मिळेल याची शक्यता नव्हती. पण तरीसुद्धा ते सर म्हणाले की मॅडम तुम्ही अगोदर जॉईन व्हा व नंतर प्रयत्न करा. विचार करत करतच सह्या केल्या .मी माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी सही केली. तिथल्या केंद्र शाळेपेक्षा ही शाळा खूप छान वाटली. शाळेत टापटीपपणा दिसून आला. सगळी शाळा फिरून पाहिली, आता सर्वात मोठा प्रश्न होता राहायचे कुठे? यासाठी गावात फिरून येण्यासाठी गेलोत, तर गावात कुठे रूम उपलब्ध नव्हती. आता गावात राहण्याची सोय नाही. गावात अपडाऊनची सोय नाही. आता काय करायचे? हा मोठा प्रश्न माझ्यापुढे पडला. शाळेच्या गेटला लागूनच एक बाई राहत होती. तिच्याकडे दोन खोल्या होत्या. आणि ती म्हटली की माझ्या दोन खोल्या पैकी एक खोली तुला राहायला देते. रूम शेणाने सारवायचीच का असेना पण राहायला जागा मिळाली त्यामुळे मन हलकं झालं. तेवढ्यात मुले बोलवायला आली मॅडम तुम्हाला तो ऑटोवाला लवकर बोलवत आहे.
अशाप्रकारे त्या शाळेच्या पहिल्या दिवशी तेथेच राहून नोकरी करायची असे ठरवले. त्या गावात दोन दोन दिवस लाईट नसायची, साधा फोन करायचा म्हटलं तर तीन किलोमीटर गावा बाहेर यावे लागत असे, अशा गावात राहायचे ठरवले. त्यावेळी एक विचार मनात येत होता की, माझ्या आई-वडिलांना काय वाटत असेल की, 'आपली मुलगी एकटी, एवढ्या लांब आपल्याला सोडून राहणार, त्यात तिच्याशी साधा फोनवर कॉन्टॅक्ट सुद्धा होणार नव्हता, जेव्हा ती रेंजमध्ये येईल तेव्हा ती सुरक्षित आहे हे त्यांना समजायचे.' हा सगळा विचार करून मन धीट केले. आपली मुलगी आणि तिची नोकरी सुरक्षित राहील हा विचार करून बप्पांनी मला त्याच गावात रहा असे सांगितले. कारण एक प्लस पॉइंट होता, शाळा खूपच छान होती, आणि गावातली माणसं पण खूप मायाळू होती. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन पसारा घेऊन येण्यासाठी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.

रोहिणी शरदराव पवार
प्रा. शि. जि.प.शाळा मुलांची ताडकळस
ता.पूर्णा जि.परभणी
मोबाईल नंबर 9067068383
E mail :- rohini.p9783@gmail.com
उपसंपादक : संतोष सेलूकर
परभणी 7709515110
सोमवार दि. १८ मे २०२० रोजी प्रकाशित होत आहे
या अंकात एका आईचा संदेश
बाळा, आज तू एक शिक्षक/शिक्षिका आहेस तेव्हा काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत.
प्रत्येक आईवडील आपला पोटचा गोळा तुझ्या हवाली करतो. त्याला आदर्श व्यक्ती म्हणून घडविण्याची जबाबदारी तुझी आहे, ते तुझे कर्तव्य आहेस ही गोष्ट कायम लक्षात ठेव.
जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील, बिघडतील हे सांगता येत नाही. मी आज तुला जे सांगत आहे, ते इतर कुणी कदाचित नाही सांगणार.
स्वत:साठी जगत असताना कायम इतरांचाही विचार कर. कारण स्वार्थाने भौतिक गोष्टी मिळवता येतात, पण आतंरिक समाधान त्यापलीकडे आहे आणि ते तू मिळवण्याचा प्रयत्न कर. तू जे काही करशील ते स्वत:शी प्रामाणिक राहून कर.
स्वत:चा विकास करत असताना सामाजिक भानही ठेव. समाजासाठी काहीतरी करण्याची संधी शोधत रहा.
आईपण आणि गुरुपण म्हणावं तेवढं सोपं नाही. विद्यार्थी आपले आचरण बघत असतात आणि ते स्वत: आचरणात पण आणत असतात. तेव्हा तू प्रत्येक कृती करताना ती विचारपूर्वक कर.
कुंभार जसे मडके घडवितो तसे तू विद्यार्थी घडव, कारण तीच तुझी खरी संपत्ती आहे, हे सदैव लक्षात ठेव. कोणी विचारले असता अभिमानाने तुला आपले कर्तुत्व सांगता आले पाहिजे.
आईवडील आपली मुले तुमच्याकडे सोपवतात कारण त्यांचा तुमच्यावर आणि शाळेवर विश्वास आहे. बाळा, या विश्वासाला कधीही तडा जाऊ देऊ नकोस. स्वत:च्या मुलांप्रमाणे शाळेतील मुलांची काळजी घे. आजही गुरु हेच सर्वश्रेष्ठ दैवत मानणारे विद्यार्थी आहेत रे!.......
पूर्ण संदेश वाचायला विसरु नका.
संपर्क :
shikshak.dhyey@gmail.com
साप्ताहिक शिक्षक ध्येय हे दर सोमवारी प्रकाशित केले जाते
भेट दया : https://shikshakdhyey.blogspot.com
Join Telegram Channel :
https://t.me/shikshak_dhyey
आमच्या फेसबुक पेजला Like अवश्य करा :
https://www.facebook.com/Shikshak_Dhyey-111156460583068/
आजच आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
https://chat.whatsapp.com/GZZP6JHWYK2Bfd8Ie895Ti
प्रशिक्षण वृतांत
*मूल्यवर्धन प्रशिक्षण गौर ता.पूर्णा*
आज दि ३ आॅक्टो २०१९ रोजी ठिक १० वा कन्या पूर्णा,पिंपळा लोखंडे व गणपूर केंद्रातील १ ते ५ ला शिकविणारे ५० टक्के शिक्षकांचे बीट स्तरीय प्रशिक्षणास सुरूवात झाली.याप्रसंगी गौर शाळेचे मुअ पांपटवार सर व केंद्रप्रमुख मा.सय्यद सर उपस्थित होते .
प्रास्ताविक साधन व्यक्ती व सुलभक श्री अंबुरे आर जी यांनी केले. प्रशिक्षण अपेक्षा बाबत सेलूकर एस.आर.यांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांची मते जाणून घेतली.प्रशिक्षण रुपरेषा, परिचय जीवनातील अविस्मरणीय क्षण सांगणे ,इ बाबत प्रशिक्षणार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.गणपूर केंद्राचे कें प्र संजय कांबळे यांनी मूल्यवर्धन बाबत ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यात येतील व योग्य प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम घेऊन जावा असे आवाहन केले.दुपार सत्रात भोजन अवकाशा नंतर अंबुरे आर. जी. यांनी मूल्यवर्धन आवश्यकता व स्वातंत्र्य ,समता व बंधुता बाबत उदाहरणासह स्पष्ट केले. दुपारी प्रशिक्षणास भेट देण्यासाठी महेश जाधव ता.समन्वयक व ढाले सर साधन व्यक्ती आले.त्यांनी प्रशिक्षण बाबत आढावा घेतला.तसेच प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. गौर शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षणासाठी सहकार्य लाभले.
एकंदर प्रशिक्षणाचा पहिला दिवस संपन्न झाला.
कवी बाबासाहेब सौदागर
*'सामान्य माणूसच माझ्या लेखनाची प्रेरणा'- *चित्रपट गीतकार* *बाबासाहेब* *सौदागर*. दि.11/08/19
पेठशिवणी ता.पालम येथे विठोबा पाटील वाडेवाले स्मृती साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय गीतकार पटकथा लेखक बाबासाहेब सौदागर यांच्या शुभ हस्ते ग्रामीण साहित्यिकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यात बालाजी जाधव अंबड ,अनिता यलमट्टे उदगीर ,वसुंधरा सुत्रावे नांदेड यांचा समावेश होता. प्रास्ताविक शंकर वाडेवाले प्रसिध्द ग्रामीण कवी यांनी केले.मा.बाबासाहेब सौदागर यांनी आपला स्वतःचा संपूर्ण जीवनप्रवास लोकांसमोर मांडला.चित्रपट गीत लेखन करतांना आणि एकंदरच स्वतःचे स्थान निर्माण करतांना किती संघर्ष करावा लागतो हे सांगताना तर अगदी रसिकांचे डोळे पाणावले.ते म्हणाले ,"की ऐन संक्रांतीच्या दिवशी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून मी गाणं लिहायला कोल्हापूर कडे निघालो.तिथे जगदीश खेबुडकर गाणं जर त्यांना चांगलं वाटलं नाही तर तसाच कागद फाडून तोंडावर फेकतात असे मला कळले होते.म्हणून त्यांच्या समोर जाण्यांची हिम्मत होत नव्हती. मला एक अभंग लिहायला सांगितला.मी एक छान अभंग लिहून खेबुडकरांकडे गेलो.मनात खूप भीती होती.त्यांनी तो अभंग वाचला अन् म्हणाले मला माझ्या गादीचा वारसदार आज मिळाला.लिहीत रहा असा आशीर्वाद दिला. आता १०० पेक्षा अधिक चित्रपटांना मी गाणी लिहीली आहेत. सत्ताधिश चित्रपट स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला सुद्धा माझीच गाणी आहेत,हे सांगितल्यावर तर रसिकांनी त्यांना गाणं ऐकवण्याचा आग्रहच धरला.लगेच त्यांनी मोबाईल सुरू केला. बोलत होते,मध्ये मध्ये स्वत:चे संघर्षमय जीवन व्यक्त करत होते. पाठीवर झेललेले प्रहार अन् मग कसे पडले गळ्यात हार हे ही त्यांनी उलगडून सांगितले.बाबासाहेब सौदागर म्हणजे मूर्तीमंत प्रतिभेचा झराच जणू.सारं काही सोसून आणि रापून त्यांच्या प्रतिभेला अशी काही धार आलेली आहे की लावणी असो किंवा अभंग असो नाही तर असू दे चित्रपट गीत अथवा मालिकेचे गीत तेवढ्याच निष्ठेने ते लिहीतात.त्यांचे शब्द रसिकांच्या मनाचा ठाव घेतात.त्यांच्या काव्यप्रतिभेला कोणीही सलाम केल्याशिवाय राहत नाही.बाबासाहेब सौदागर आणि आम्ही शेतशिवार प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते दिवसभर सोबत होतो.त्यांच्या गाण्यातला सच्चेपणा त्यांच्या वागण्या बोलण्यातून ओघळावा त्याप्रमाणे ते अगदी सहज ग्रामीण शेतकरी आणि कामकरी लोकांशी संवाद साधत होते.सामान्य माणूसच माझ्या लेखनाची खरी प्रेरणा आहे हे सांगायला सुध्दा ते विसरले नाहीत.चित्रपट गीतकार म्हणून कुठलाच मोठेपणा न मिरवता भरभरून ते लोकांशी बोलत होते.स्वत:च्या वाट्याला आलेले कटू अनुभव सुद्धा त्यांनी समर्थपणे पेलले परंतु कधी निराश होऊन नशापाणी केले नाही .काव्याची नशा आशा प्रकारे होती की सारं काही त्यामुळंच घडलं,नोकरी सोडून काव्यलेखन करून आपण स्वत:चे कुटूंब चांगल्या प्रकारे चालवू शकतो हा आत्मविश्वास घेऊन ते गीतलेखनाकडे वळले.आज १०० पेक्षा अधिक चित्रपटाला त्यांनी गाणी लिहीली असून पटकथा लेखन ही केले आहे. शंकर वाडेवाले दादा असा वारंवार उल्लेख करत करत ग्रामीण कवितेवर असलेले त्यांचे प्रेम शब्दाशब्दांमधून दिसून येत होते.जेवढी त्यांची गीतलेखनाची प्रतिभा विलक्षण आणि सच्चेपणाची आहे तेवढाच त्यांच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त होणारा सच्चेपणा विलक्षण वाटतो.स्वत:ची आजी ओव्या गाऊन नवनिर्मीती करायची आणि याच संस्कारातून मी कविता लिहू लागलो.अन्यत:आमच्या घरात कवितेला स्थान नव्हते.शेतीत आईला मदत करत करत सर्व भावंडांचे शिक्षण केले.बहिणीच्या लग्नासाठी स्वत: चा काहीही विचार न करता साटे- लोटे लग्न करण्याचा प्रसंग ही त्यांनी बोलतांना सांगितला. असा हा प्रतिभावंत अस्संल ग्रामीण कवी गीतकार माणूस ज्याला विक्रम गोखलेसारख्या दिग्गंज कलाकाराने हॅट्सऑफ केले.खरोखरंच अतिशय मनस्वी कलावंताला भेटून आम्हाला एखाद्या उंच शिखरावर जाऊन दिव्य काही तरी कामगिरी केल्यासारखी अनुभूती आली तर
धन्यवाद!
शब्दांकन
*संतोष सेलूकर*
परभणी
७७०९५१५११०
TAG मिटींग अभिप्राय
*Tag meetings* in Cps Ganpur tq : Purna dist : Parbhani
🏵 We attended the meetings with full of joy and enjoyed it .
🏵meetings are very useful for teachers as well as students
🏵 The way we tag members express our thoughts ,it is very interesting and full of humour.🏵I am very glad to say that most of the tag members are taking part in communication as compare to last year's tag meetings.
🏵co-ordinator Sarika Giri mam has Shown the path and we all members have followed it,added our experience too. 🏵and today the the tag members who were hesitating at first now they are expressing their thoughts in English.
🏵We discuss in meetings and decide some goals as our target of that month.
🏵All tag members work on it and share their views
🏵one good thing is that we choose one activity song or poem and present it in the meetings.all members participate in it.
🏵we always have eager about next meeting
🏵so these meetings are playing a master roll for our English improvement.
🏵Thank u so much .Myself Sarika kalwit
Tag member Ganpur tq Purna dist parbhani
सुधारित दर
*शापोआ नवीन सुधारित दर ( इंधन भाजीपालासाठीचा )*
🔴 १ ते ५ साठी = १.५७
( प्रति विद्यार्थी प्रति दिन याप्रमाणे )
🔴 ६ ते ८ साठी = २.३५
( प्रति विद्यार्थी प्रति दिन याप्रमाणे )
शिक्षण परिषद गणपूर
*🌷शिक्षण परिषद गणपूर* 🌷 २०१९-२० वर्षातील पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद अविस्मरणीय ठरली.☘☘ सुरूवात अत्यंत साधेपणाने झाली.गावचे सरपंच व शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षण प्रेमी नागरिक परिषदेत सहभागी झाले ही अत्यंत स्तुत्य बाब वाटली.☘फक्त सहभाग घेतला नाही तर शाळेसाठी १४व्या वित्त आयोगात निधी देऊन ज्या गरजा आहेत; त्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन ही दिले. ☘ उद्घाटन व भाषणबाजी यात अधिक वेळ न घेता महत्त्वाच्या विषयाला सुरूवात झाली.🍀नवीन आलेले तांबे सर व वाडीकर सर यांचे स्वागत करण्यात आले.🍀 अध्ययन स्तर टाॅप शाळांचे अभिनंदन करण्यात आले.बाॅटम शाळांना आपण टाॅप पासून किती अंतरावर आहोत हे समजले. 🍀ब-याच वर्गाची गुणवत्ता ९० - १०० टक्के असल्याचे समजले 🍀 नंतर शिक्षकांचे तीन गट करण्यात आले १-३ ४-५ तसेच ६-८ अध्ययन निष्पत्ती नुसार विषय निहाय आराखडे तयार झाले 🍀
गटात चर्चा होत होत्या.प्रत्येकजण आपले अनुभव सांगत होता.☘ वेगवेगळी मत- मत्तांतरे दिसून येत होती परंतु आपसात मतभेद नव्हते.जो तो दुस-याच्या मताचा आदर राखत आपले मत मांडत होता.☘ बिबेकर सर यांनी स्वत:चे मुरमुरे टाकून प्रसादात चांगलीच भर घातली.🍀मग सर्वांनीच आपापले मुरमुरे प्रसादात टाकून वाटायला सुरूवात केली.🍀मग मा. केंद्रप्रमुख कांबळे साहेबांनी तर डायरेक्ट आजीबाईने दिलेला लाडूचा डब्बाच परिषदेत उघडला.एवढी बौद्धीक मेजवानी दिल्यावर काय ? सर्वं जण पाऊस नसल्यामुळे आनंदाच्या उन्हातच न्हाऊन निघाले.🍀 दुपारी गणपूर शाळेने सर्वांना रुचकर व स्वादिष्ट भोजनाची सोय केल्यामुळे शिक्षण परिषदेत जणू दुग्ध शर्करा योग पहावयास आला.🍀 सर्वांची पूर्णवेळ उपस्थिती हे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.🍀वर्गातील रोजच्या तोचतोपणाला कंटाळलेल्या शिक्षकांना महिण्यातून एक दिवस अशी मुक्तपणे शिक्षक मित्रांशी गप्पा मारणे अर्थात अनुभवाच्या शिदोरीची देवाणघेवाण करणे.यासाठीच तर या शिक्षण परिषदेचे प्रयोजन असते.☘ शेवटी मु.अ.बळवंतकर जाधव सर गरुड सर गोविंदवार व बिबेकर सर यांनी खूप परिश्रम घेतले व शिक्षण परिषद यशस्वी केली. ☘सर्व सि.आर.जी.मेंबर्सनी आपापली भूमिका योग्यपणे पेलली.☘पवार सर गडगिळे सर शिंदे सर जाधव सर यांनी नको नको म्हणलं तरी सर्वांना वेतनवाढीची भेट बि.ई.ओ.साहेबां मार्फत दिली तरी त्यांना ही धन्यवाद .☘अशी शिक्षण परिषद झाली की सर्वांच्या सदैव स्मरणात राहील .धन्यवाद
शब्दांकन
संतोष सेलुकर ,बलसा
Subscribe to:
Posts (Atom)